Skip to main content

Posts

Showing posts from January, 2018

दखल - शेतकर्‍यांच्या नावावर आमदारांचा विदेश दौरा.

मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. शिवराजसिंग चौहान यांच्या मुख्यमंत्रिपदाला पंधरा वर्षे झाली आहेत. इतकी वर्षे भाजपची सत्ता असल्यामुळं सरकारच्या कारभाराविरोधात नाराजी होणं स्वाभावीक आहे. तशी ती झाली आहे. त्याचं प्रतिबिंब त्रिचूर व नंतर झालेल्या निवडणुकीत उमटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाऊँगा, ना खाने दुँगा असं म्हटलं असलं, तरी मध्य प्रदेशातील विविध घोटाळ्यांकडं मात्र त्यांचं लक्ष नाही. व्यापमं घोटाळा देशभर गाजला. गेल्या दीड महिन्यांपूूर्वी विविध प्रकरणातील सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे घोटाळे बाहेर आले. सरकारी खर्चानं पर्यटनमंत्र्यांनी त्यांच्या नातेवाइकांना कर्नाटकची सहल घडविली. त्याविरोधात आवाज उठल्यानंतर या मंत्र्यानं नातेवाइकांच्या प्रवासाचा खर्च स्वत: च्या खिशातून करण्याचं जाहीर केलं.  मध्यंतरी वनमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरं अशीच वेशीवर टांगली गेली. त्याविरोधात आवाज उठल्यानंतरही सरकार काहीच कारवाई करायला तयार नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौैहान हतबल झाल्यासारखे वागत आहेत. देशात शेतीसाठी चांगली तरतूद, भावांतर सारख्या योजना राबवूनही तेथील शेतकर्‍यांचं आंदोलन झालं. मंद

दखल - धर्मा पाटलांच्या निधनामुळं भाजपची कोंडी

केंद्र व राज्य सरकार शेतकर्‍यांसाठी कितीही चांगल्या योजना आणल्याचा दावा करीत असलं, तरी देशात शेतकर्‍यांची परिस्थिती काय आहे, याचं चित्र केंद्र सरकारच्याच आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झालं आहे. शेतकर्‍यांना वारेमाप आश्‍वासनं देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात शेतकर्‍यांची स्थिती हलाखीची झाली. शेतीकर्ज माफ केल्याची घोषणा केल्यानंतरही महाराष्ट्रात दीड हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. नोटाबंदीच्या पहिल्या वीस दिवसांत शेतकर्‍यांचं 4200 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर ते किती झालं, याचा हिशेबच नाही. ऊस, सोयाबीन, मूग, कापूस, तूर अशा कोणत्याच शेतीमालाला भाव नाही. हमीभावाइतकीही रक्कम मिळत नाही. शेतकरी नाराज आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरच्या आंदोलनानं देशातील शेतकरी संघटना एकत्र आल्या. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ग्रामीण भागात भाजपच्या यशाचं प्रमाण कमी झालं. अशात शेतकरी रोष व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करीत आहेत. मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा केलेला प्रयत्न असो, की मंत्रालयात विष पिऊन केलेली आत्महत्या; सर्व उपा