मध्यप्रदेशमधील भाजपच्या सरकारला नाराजीचा सामना करावा लागत होता. गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत 19 पैकी नऊ जागांवर भाजपला कसाबसा विजय मिळाला. नऊ जागा काँगे्रसनं मिळविल्या. एका जागी भाजपचा बंडखोर विजयी झाला. त्याअगोदर त्रिचूरची जागा काँगे्रसनं जिंकली होती. ही सर्व पार्श्वभूमी पाहिली, तर मध्य प्रदेश पूर्वीइतकं मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना सोपं राज्य राहिलेलं नाही. चौहान यांना सत्तेत येऊन 15 वर्षे झाली आहेत. नकारात्मक मतदानाचा फटका त्यांच्या सरकारला बसणार आहे. सरकारविरोधातील नाराजी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळं तर विधानसभेच्या निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असताना शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार केला. तीन नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. सर्व विभागांना समान प्रतिनिधित्त्व देण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आल्याचं शिवराजसिंह चौहान सांगत असले, तरी गुजरात व राजस्थानमधील निवडणुकीनं भाजप सावध झाला आहे, असंं मानण्यास जागा आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी तीन नव्या मंत्र्यांना शपथ दिली. गुजरातमध्ये भाजपनं सत्ता कायम र